बंद

    बाह्य रूपरेखा

    महाराष्ट्र भारताच्या पश्चिम व मध्य द्वीपकल्पीय प्रदेशात वसलेला असून त्याचे क्षेत्रफळ ३,०८,००० चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राला अरबी समुद्राचा ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेला भामरागड-चिरोली-गायखुरी पर्वतरांगा या त्याच्या नैसर्गिक सीमा आहेत.

    राज्याची सहा महसूल विभाग आणि ३६ जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. येथील हवामान उष्णकटिबंधीय मोसमी असून उष्ण, पावसाळी आणि थंड ऋतुमान अनुभवता येते. मार्च ते जून ह्या कालावधीत उन्हाळा, त्यानंतर जूनमध्ये पावसाळा आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळा येतो. उन्हाळ्यादरम्यान महाराष्ट्रातील अकोला, भंडारा, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ हे १५ जिल्हे उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असतात.

    महाराष्ट्राचे वार्षिक पर्जन्यमान १३६३ मिमी एवढे असून 80% हून कमी पाऊस पावसाळ्यादरम्यान (जून – ऑक्टोबर) पडतो. पश्चिम घाटांच्या पर्वतीय परिणामामुळे महाराष्ट्राच्या पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणावर कोकण (2776 मिमी), विदर्भ (966 मिमी), मध्य महाराष्ट्र (727 मिमी), आणि मराठवाडा (669 मिमी) अशी तफावत दिसून येते.

    हिवाळ्याच्या महिन्यांत महाराष्ट्राच्या अंतःक्षेत्रात राज्याच्या किनारी भागाच्या तुलनेत कमी तापमान असते. राज्याच्या विविध भागात किमान सरासरी तापमान 13.5 डिग्री सेल्सियस ते 19.4 डिग्री सेल्सियस दरम्यान नोंदवले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या उत्तर मध्य भागासह भंडारा आणि नागपूर सारख्या उत्तर भागातील जिल्ह्यांमधे सर्वात कमी सरासरी दैनिक किमान तापमानाची नोंद होते.

    कोविड-19 ह्या जगद्व्यापी साथीमुळे राज्याची आरोग्याबाबतच्या आपत्कालीन परिस्थितीतली असुरक्षितता अधोरेखित झाली. एसडीएमएच्या नेतृत्वाखाली आणि डीडीएमएच्या सहाय्याने महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि संसाधनांच्या जोडीने सातत्याने वाढ करणे आवश्यक आहे. राज्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन योजना तयार केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 1993च्या लातूर भूकंपानंतर महाराष्ट्राने पहिले आपत्ती व्यवस्थापन युनिट स्थापन केले, हे नंतर राष्ट्रीय रचनेत समाविष्ट करण्यात आले.