बंद

    कार्यशाळा आणि परिसंवाद

    महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणांतर्फे शासन आणि गट/ समुदायातील भागधारकांना माहिती देण्यासाठी, संवेदनशील बनवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. आयोजित केली गेलेल्या प्रमुख कार्यशाळा आणि परिसंवाद पुढीलप्रमाणे :

    उष्मालाटेसंदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा 2025

    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या उष्मालाटेसंदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत तीव्र उष्णतेला तोंड देण्यासाठी शहर स्तरीय उष्णता उपाययोजना आराखडा राबवायचे निश्चित करण्यात आले. ”शहर-स्तरीय उष्णता कृती आराखड्यांची प्रगती: संवेदनक्षम समुदायांसाठी बहुउद्देशीय अनुकूलन (शहर-स्तरीय हीट ॲक्शन प्लॅन्सची प्रगती: लवचिक समुदायांसाठी बहु-क्षेत्रीय अनुकूलन)” असे ह्या कार्यशाळेचे विषयसूत्र होते. ह्यावेळी भारतातील उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे हवामान बदल, शहरीकरण आणि अर्बन हीट आयलंड (यूएचआय) प्रभाव यांवर चर्चा करण्यात आली.

    कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात, त्यांनी बहुउद्देशीय अनुकूलन धोरणे आखण्याची तातडीची आवश्यकता, प्रारंभिक इशारा प्रणाली मजबूत करणे आणि तीव्र उष्णतेच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आंतरसंस्थात्मक समन्वय वाढवण्याचे महत्त्व यावर भर दिला. त्यांनी महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना शहरी गरीब, वृद्ध, मुले आणि आधीपासून आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींसाठी, आकडेवारीवर आधारित आणि विज्ञान-साधित धोरणे राबवून दुबळ्या समुदायांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

    या कार्यशाळेत 250 हून अधिक प्रतिनिधी एकत्र आले होते आणि यामध्ये सरकारी अधिकारी, शहर नियोजनकर्ते, संशोधक आणि यूएनडीआरआर, यूएनईपी, यूसी बर्कले, हार्वर्ड विद्यापीठ आणि युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट प्रोग्रॅम यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ह्यावेळी त्यांनी उष्णतेशी संबंधित आरोग्य अनुकूलन, पायाभूत सुविधांची संवेदनशीलता आणि उष्णता कृती आराखड्यांसाठी वित्तपुरवठा कार्यतंत्राबद्दल चर्चा केली. ह्या सत्रांमध्ये धोरणांचे प्रमाणीकरण, सामग्री संकलन, शहरी शीतन योजनांबद्दल विचारविनिमय झाला. ह्यामध्ये खास करून निवडक शहरांमधील एचएपीची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी आणि सीइइडब्ल्यू, एनआरडीसी आणि एसएफसी यांसारख्या संस्थांसोबतच्या सहकार्यावर भर देण्यात आला. एक पूर्ण सत्रभर भविष्यातील सहकार्यांबद्दल चर्चा झाली. यात कूल रिडिझाइन प्रकल्पावरील यूएनईपी-एनडीएमए भागीदारी, यूसी बर्कलेसह संशोधन सहकार्य आणि प्रगत उष्णता अंदाजासाठी आंतर-एजन्सी कृती दलाची स्थापना यासह कृती करावयाच्या प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यशाळेचा समारोप तीव्र उष्णतेच्या घटनांपासून दीर्घकालीन आणि शाश्वत संवेदनशीलता निर्माण होण्याकरता भारतीय उष्णता कृती आराखड्यांसाठी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती अंगिकारण्याच्या दृढ निश्चयाने करण्यात आला. महाराष्ट्राचे धोरणाधारित आणि विज्ञान-साधित उष्णता अनुकूलन धोरणांमधील नेतृत्व एक नमुना म्हणून अधोरेखित केले गेले. ह्यामुळे राज्याच्या आपत्ती पूर्वतयारी आणि हवामान संवेदनशीलत्यासाठी राज्याच्या समर्पित कार्याला बळकटी प्राप्त झाली.

    संवेदनशील राज्यांच्या दिशेने : आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी एसडीएमए सक्षम करणे ह्यावर एक दिवसीय कार्यशाळा

    डॉ. सोनिया सेठी, अतिरिक्त मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी 21 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारे (एनडीएमए) आयोजित “संवेदनशील राज्यांच्या दिशेने : आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी एसडीएमए सक्षम करणे” या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग घेतला. एसडीएमएचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ आणि धोरणकर्ते यासारख्या महत्वाच्या भागधारकांना एकत्र आणून आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी एसडीएमएच्या क्षमता वाढवण्याच्या ध्येय धोरणांवर चर्चा व विचारविनिमय करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते.

    ‘महाराष्ट्र राज्य भूस्खलन व्यवस्थापन योजना, 2004’ या विषयावर 22 फेब्रुवारी 2025रोजी आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीत सादरीकरण

    फेब्रुवारी 2025 रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आंतरराज्य परिषद सचिवालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीत डॉ. सोनिया सेठी, अतिरिक्त मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत डॉ. सोनिया सेठी यांनी ‘महाराष्ट्र राज्य भूस्खलन व्यवस्थापन योजना, 2004’ या विषयावर सादरीकरण केले. या सादरीकरणात त्यांनी राज्याच्या आदर्श आपत्ती व्यवस्थापन क्षमतांबाबत तसेच विविध आपत्ती घटनांच्या शक्यतांसोबत भूस्खलन प्रवण भागांबाबत माहिती दिली. तसेच, भूस्खलन व्यवस्थापनासाठी व्यापक ध्येय धोरणे, तसेच राज्याच्या 2004 च्या भूस्खलन जोखीम व्यवस्थापन योजनेच्या अंमलबजावणीविषयी विस्तृत माहिती सादर केली.

    आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यशाळा 2024

    आपत्ती जोखीम कपात व क्षमता बांधणी ह्या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा नाशिक येथे 2-3 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्रचे अधिकारी, 36 जिल्ह्यांतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सहभागी झाले होते. ही कार्यशाळा सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि नवउपक्रम यांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यशाळेद्वारे सर्वोत्तम पद्धतींचा शोध घेण्यासाठी, भविष्यातले धोके ओळखण्यासाठी आणि राज्य स्तरावरील जोखीम कमी करण्यासाठी कृतीयोग्य तंत्रकौशल्ये विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ, व्यावसायिक आणि भागधारक एकत्र आले होते.

    “हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन” विषयावरील कार्यशाळा

    विदर्भ विभागासाठी “हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 7 मार्च 2025 रोजी नागपूर येथे करण्यात होते. या कार्यशाळेत कृषी विभाग, जिल्हा कृषी हवामान विभाग (डीएएमयू ), कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), संशोधन केंद्रे, विदर्भ हवामान उपविभागातील कृषी विद्यापीठे/महाविद्यालयांचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, पोलिस, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उद्दिष्ट सहभागी अधिकारी व प्रतिनिधींना हवामान खात्याच्या (आयएमडी) गंभीर हवामान घटनांशी संबंधित सेवा व माहितीचा परिचय करून देणे आणि विशेषतः परिणामांवर आधारित हवामान भाकितांवर लक्ष केंद्रित करणे हे होते.

    उष्मालाटेची तयारी आणि व्यवस्थापन कार्यशाळा 2024

    महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत 08.02.2024 ते 09.02.2024 या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील तीव्र उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि समुदायाच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला. महाराष्ट्रातील नागरिक तीव्र उष्णतेपासून सुरक्षित रहावे यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी धोरण सुधारणा, जनजागृती मोहीम आणि पायाभूत सुविधा सुधारणा यांसंबंधी शिफारसी करण्यात आल्या. या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, पोलिस, महसूल आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला.

    जळगाव जिल्ह्यातील शालेय सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन योजनेसाठी कार्यशाळा

    10 जानेवारी 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील 350 शाळांसाठी शालेय सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्दिष्ट आपत्तीपूर्व तयारी वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देणे आणि विविध संकटांना तोंड देण्यासाठी त्यांना सक्षम करणे असे होते. या कार्यशाळेत सर्व शाळांचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते.