बंद

    महाराष्ट्रातील प्रमुख आपत्ती व्यवस्थापन संस्था

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए)

    जिल्हा पातळीवर, डीडीएमए ही डीडीएमपी आणि एसडीएमए मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करण्यासाठी निस्पंद (नोडल) प्राधिकरण आहे. त्याचे नेतृत्व जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून करतात, आणि स्थानिक प्राधिकरणाचा निवडून आलेला प्रतिनिधी सह-अध्यक्ष असतो. तथापि, मुंबईच्या बाबतीत, त्याच्या शहरी स्वरूपामुळे, महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरीय जिल्ह्यांसाठी बृहन्मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नेतृत्व बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) (जीआर. दिनांक 19/01/2011) चे आयुक्त करतात.

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा (डीडीएमपी) तयार करणे आणि राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन धोरणे आणि राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे ही देखील डीडीएमए ची जबाबदारी आहे.

    राज्य आपत्कालीन परिचालन (ऑपरेशन्स) केंद्र (एसईओसी):

    महाराष्ट्र एसईओसी, आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद आणि समन्वय साधण्यासाठी एनडीएमए ला मदत करते. ते मुंबईत स्थित आहे. राज्यस्तरीय आपत्कालीन परिचालन केंद्र हे आपत्ती व्यवस्थापनाचे तांत्रिक केंद्र आहे . ते अत्याधुनिक आपत्कालीन संप्रेषण, आयसीटी पायाभूत सुविधा आणि स्मार्ट जीआयएस आधारित निर्णय समर्थन प्रणालीने सुसज्ज आहे आणि कार्यक्षम समन्वयासाठी 36 डीईओसी, प्रतिसाद दल आणि सतर्क एजन्सींशी एकत्रित होण्याची अपेक्षा आहे.

    महाराष्ट्रातील समर्पित प्रतिसाद दल :

    राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)

    राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची स्थापना 2006 मध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार 8 बटालियनसह करण्यात आली होती, जी आता 16 बटालियनमध्ये विस्तारली आहे, ज्यामध्ये प्रत्येक बटालियनमध्ये 1149 कर्मचारी आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल हे एक विशेष प्रतिसाद दल आहे जी आपत्तींदरम्यान बचाव आणि मदत कार्य करते. रासायनिक, जैविक, किरणोत्सारविषयक आणि आण्विक (सीबीआरएन) आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तज्ज्ञता पारंपारिक बचाव कार्यांच्या पलीकडे विस्तारते. या व्यतिरिक्त, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नियमितपणे विविध भागधारकांसाठी टेबल-टॉप आणि मॉक एक्सरसाइज, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी आणि जागरूकता निर्माण कार्यक्रम देखील आयोजित करते.

    राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ची 5 वी बटालियन सध्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील सुदंबरे येथील त्यांच्या नवीन कॅम्पसमध्ये तैनात आहे ज्याच्या जबाबदारीच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि गोवा राज्य समाविष्ट आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ची 5 वी बटालियन 6 कंपन्यांची बनलेली आहे ज्यामध्ये 18 स्वयंपूर्ण विशेष शोध आणि बचाव पथके आहेत ज्यात संरचनात्मक अभियंते, तंत्रज्ञ, तारतंत्री (इलेक्ट्रिशियन), कॅनाइन युनिट आणि वैद्यकीय/परावैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ची 3 पथके मुंबईत, 1 पथके पालघर आणि 1 पथके नागपूर जिल्ह्यात आणि उर्वरित पथके पुणे केंद्रात तैनात आहेत.

    राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)

    आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 44 मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) स्थापन करण्याची तरतूद आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या रचनेवर आधारित, राज्यातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी 30.08.2014 च्या सरकारी ठरावाद्वारे धुळे आणि नागपूर जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या दोन कंपन्या स्थापन करण्यात आल्या. राज्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रासह, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह रासायनिक अपघात, रस्ते वाहतूक अपघात, पूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ, आग आणि भूस्खलन यासारख्या विविध आपत्तींना हाताळण्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

    ही उपयुक्तता लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) दोन नवीन कंपन्या स्थापन करण्यास मान्यता दिली आहे – एक नवी मुंबई (कोंकण विभाग) आणि एक दौंड (पुणे विभाग) येथे – सरकारी निर्णय क्रमांक आव्र्य -2021/ प्र . क्र. 304/ आव्र्य -1 द्वारे. प्रत्येक राज्य आपत्ती प्रतिसाद दल कंपनीकडे एकूण चार पथके असतील. यापैकी तीन पथके आपत्ती प्रतिसादासाठी समर्पित असतील, तर एक पथक प्रशासकीय कामांसाठी काम करेल. तीन आपत्ती प्रतिसाद पथकांपैकी प्रत्येक पथकात 45 अधिकारी/कर्मचारी असतील आणि चौथ्या प्रशासकीय पथकात 79 अधिकारी/कर्मचारी असतील. अशा प्रकारे, प्रत्येक राज्य आपत्ती प्रतिसाद दल कंपनीत एकूण 214 अधिकारी/कर्मचारी असतील.